*अक्षर खराब येण्याची कारणे** :-
*१* )* एकाग्रतेचा अभाव
*२ )* लेखनाची इच्छा नसणे , कंटाळा येणे , बॉलपेन व जेलपेनने सराव करणे . पेनाच्या मागे टोपन लावून पेनचे वजन वाढते .
*३* ) वही , पेन नीट न धरणे .
*४ )* आत्मविश्वास नसणे .
*५* ) मन चंचल असणे .
*६* ) हात दुखणे .
*७* ) नियमित लेखनाचा सराव नसणे .
*८* ) जलद गतीने लेखन करणे .
*९* ) अक्षरांचे मुळ स्वरुप माहीत नसणे .
*१०* ) अक्षर काढण्याचा क्रम माहित नसणे .
*११* ) समजून न घेता फक्त लिहिल्याने अक्षर सराब होते .
*१२* ) अक्षरांचे अवयव , काना , मागा वेलांटी नीट योग्य पद्धतीने व काढल्यास .
*१३* ) प्रयत्न न करणे .
*१४* ) माझे अक्षर चांगले होणारच नाही अशी नकारघंटा सतत वाजवल्यामुळे अक्षर खराबच राहते .
*१५* ) त्याला काय होतयं , मला हे असचं जमतं .
*१६* ) माझ्या हाताला वळणचं नाही .
*१७* ) पहिल्यापासून माझे अक्षर खराबच आहे , ते आता काय सुधारणार..
*१८* ) अक्षर चांगले काढल्याबद्दल न्यूनगंड मनात असणे .
*१९* ) मनात स्वत:ला बदलण्याची इच्छा नसणे .
✳✳✳✳✳✳✳
*अक्षर सुंदर काढण्यासाठी काही प्रमुख उपाय*
*१* ) एकाच वळणात , समान उंचीचे , योग्य अंतर ठेवून लिहावे.
*२* ) तुम्हाला सुयोग्य वाटणारे वळण निवडून जाणीवपूर्वक त्याच वळणात प्रत्येक अक्षर, शब्द, वाक्य लिहावे.
*३* ) सुरुवातीला अक्षर लेखनाची गती कमी ठेवावी.
*४* ) अक्षर, शब्द पूर्ण लिहून झाल्यानंतर शिरोरेषा म्हणजे अक्षरवरची रेषा डावीकडून उजवीकडे वहीच्या रेषेवर सलग व सरळ काढण्याचा सराव करावा .
*५* ) अक्षर लिहीताना योग्य दिशेने सुरुवात करावी म्हणजे अक्षराचे अवयव योग्य क्रमाने काढावेत .
*६* ) अक्षर सुंदर होईपर्यंत सावकाश लिहावे . लेखनीवर नियंत्रण ठेवून लेखन करावे .
*७* ) प्रथम मोठी व ठळक अक्षरे योग्य पद्धतीने काढण्याचा योग्य सराव करावा ,
*८* ) मनापासून प्रयत्न करणे, प्रयत्न करतच राहणे, सातत्याने सराव करतच रहावा, चिकाटी सोडू नये.
*९* ) ज्यांचे अक्षर सुंदर आहे त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. त्यांच्याकडून तंत्र शिकावीत. निरीक्षणातून शिकावे.
*१०* ) लेखनापूर्वीचा सराव , उभ्या - आडव्या रेषा व इतर अक्षरांचे अवयव यांचा चांगला सराव करुनच अक्षर लेखनाकडे वळावे .
*११* ) अक्षर लेखनाचा सराव करण्यासाठी दुरेघी, चाररेघी, आलेख कागद, चौकडी खुणा असलेली वही अक्षरांची उंची , आकार वळण चांगले येण्यासाठी वापरल्यास चांगला फायदा होईल.
*१२* ) शुद्ध शब्द, विराम चिन्हे, सुवाच्च हस्ताक्षर हे चांगल्या लेखनाचा मुळ पाया आहेत. हस्ताक्षर सुधारण्यासाठी खूप मेहनत घ्या, कारण प्रथम पडलेली छाप ही शेवटपर्यंत कायम राहते . अभ्यास कौशल्य परिणामकारक होण्यासाठी लेखन कौशल्य खूप महत्त्वाचे असते.
*१३* ) दोन ओळी अंतर अक्षराच्या उंचीएवढे असावे. दोन शब्दात र अक्षर लिहिता येईल एवढे अंतर असावे. प्रत्येक अक्षर व अंक ५० ते ६० वेळा काढून सराव केला पाहिजे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.